ताज्या बातम्या

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन


जळगाव – बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी – पुरुष आणि महिला – अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे.पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी सातत्याने प्रत्येक सामना अचूक रणनीती आणि एकाग्रतेने हाताळला. त्याच्या अनेक खेळांमधील निर्णायक चाली पाहून संपूर्ण जगाने त्याच्या कौशल्याचे कौतुक केले. महिला संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. त्याच्या खेळात संयम आणि जिद्द दिसून आली.या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल. भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन”म्हणता येईल चेस किंवा शतरंज हा मूळ भारतीय खेळ आहे, आणि त्याची उत्पत्ती भारतात प्राचीन काळात झाली. शतरंजचे मूळ रूप संस्कृतमध्ये “चतुरंग” म्हणून ओळखले जात असे सध्याची भारतीय युवा खेळाडूंची पिढी अत्यंत प्रतिभाशाली आहे.अर्जुन एरिगैसी,डी गुकेश, प्रज्ञाननंदा, विदित गुजराथी, दिव्या देशमुख, टी.आर. वैशाली सारखे खेळाडू जागतिक स्तरावर यशस्वी होत आहेत, ज्यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.सर्व विजयी खेळाडू,कर्णधार, प्रशिक्षकांचे, AICF चे पदाधिकारी या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। अतुल जैन अध्यक्ष,जळगाव जिल्हा चेस एसोसिएशन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button