सबगव्हाण टोल नाक्यावर स्थानिकांना सात दिवसांच्या आत टोल मुक्ती द्या – अमोल पाटील
पारोळा —प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोल नाक्यापासून २० कि.मी.च्या आत पारोळा शहरासह सभोवतालील ग्रामीण भाग हे कार्यक्षेत्र येते येथील नागरिक दररोज दैनंदिन कामकाजा निमित्त यात शालेय-महाविद्यायीन कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, दैनंदिन रुग्ण, आपला उदरनिर्वाह भागविणारे कामगार, वाहन चालक हे ये-जा करीत असतात. यात टोलच्या भुर्दंडामुळे प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना नाहाक खिशाला कैची लागते. त्यामुळे हा टोलनाका सुरु झाल्यापासून दैनंदिन नागरिकांना ह्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन प्रवास करणारे वाहन धारक हे स्थानिक असल्याचे आवश्यक ते पुरावे देखील सादर करीत असतात, परंतु तरी देखील टोल व्यवस्थापकाचा मनमानी कारभारामुळे टोल दर हा भरावाच लागतो. आज या रस्त्यावर दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन धारक यांनी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेत त्यांना होत असलेला दैनंदिन त्रासाबद्दल आपल्या व्यथा सांगितल्या व नागरिकांना होत असलेल्या त्रासा बद्दल अवगत केले असता अमोल पाटील यांनी त्वरित नागरिकांसह टोलनाका गाठला व दररोज सुरु असलेल्या समस्यांना आपल्या कडून आजवर फक्त आश्वासने देण्यात आली, परंतु स्थानिक नागरिकांना कुठेही याचा लाभ देण्यात आला नाही, दैनंदिन सुरु असलेली लुट ही येत्या ७ दिवसांच्या आत बंद करा, अन्यथा या टोलाची तोड-फोड करून टोल बंद करण्याचा इशारा अमोल पाटील यांनी टोल व्यवस्थापकांना दिला याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, या मार्गाने दैनंदिन रहदारी करणारे वाहन धारक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.